
राज्यातील अपघातांचे वाढते प्रमाण हे आज सर्वांच्याच चिंतेचे कारण बनले आहे. लोक त्यावर आपापल्या परीने मार्ग सुचवत आहेत. काहीजण आपल्या परीने मार्ग काढत आहेत. पण ही समस्या सुटण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. काही स्वयंसेवी संस्था यावर मार्ग काढण्यासाठी धडपडत आहेत. पण त्यांची धडपड सरकारच्या पाठबळाअभावी व्यर्थ जात आहे. तरीही लोकांत जागृती करण्याचे काम या संस्था करीत आहेत. अपघात टाळण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. मात्र त्या पातळीवर सगळे आलबेलच आहे. कुठेतरी अपघाताचे मोठे प्रकरण घडले की सरकारला जाग येते. वाहतूक समस्येवर तोडगा निघूच शकणार नाही किंवा निघू शकत असेल तर तो काय असेल? अशा अनेक अंगांनी ओपन फोरममध्ये चर्चा करता येईल. याबाबत आपली मते नोंदवा...
